तणावात असताना आपल्या मनात वेगेवेगळे बदलाव होतात. तसेच आपण कोणता जास्त वापरतो ह्यातही बदल होतो. तणाव नसताना आपण प्रबळ कार्यकर्ता जास्त वापरतो, त्याला साहाय्य म्हणून त्यानंतर सहाय्यक कार्यकर्ता वापरतो, व जसे चवड आहे तसे कार्यकर्ते हळू हळू कमी वापरले जातात. तणाव वाढल्यावर आपण आपल्या प्रबळ कार्यकर्त्यावर जास्त जोर टाकतो. तोच आपण तणावात वापरतो व तणाव दूर करायचा प्रयत्न करतो. तरीही तणाव दूर नाही झाल्यास आपण साहाय्यक कार्यकर्त्यावर जोर देतो, नाही म्हटल्यासारखे आपण प्रबळ कार्यकर्ता वापरतच नाही. तरी जर तणाव दूर नाही झाला तर आपण तिसऱ्या कार्यकर्त्याकडे वळतो, व तरीही जर तणाव दूर नाही झाला तर मग आपण निकृष्ट कार्यकर्त्याकडे वळतो. चौथ्या कार्यकर्त्याकडे वळल्यावर जरीही बाहेरील तणाव दूर झाला तरी आपण तणावात राहतो, व आपल्याला परत पाहिल्यासारख्या स्थितीत जाणे अवघड जाते. ह्याला निकृष्टची पकड असे म्हणतात. निकृष्टच्या पकडीतून सुटणे अवघड असते. ह्या काळात आपण वेगळेच वागायला लागतो. ENTJ सारखा तर्कस्त माणूस एकदम भावणूक होतो. निकृष्ट कार्यकर्ता प्रबळ नसल्याने आपण चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. ह्या काळातून बा...